11th Admission Final Round: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि पालकाचं स्वप्न असतं. मात्र, यंदा शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये राज्यात आलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर गदा आली होती. ज्यांना अर्ज भरायला मिळाला नाही, किंवा तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश निश्चित करता आला नाही, त्यांची धाकधूक साहजिकच वाढली होती.
पण आता ही चिंता दूर झाली आहे! शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ब्रेक लागला होता, पण आता शिक्षण विभागाने त्यांच्यासाठी 11th Admission Final Round ची घोषणा करून मोठा दिलासा दिला आहे.
11th Admission Final Round शिक्षण विभागाने का घेतला हा महत्त्वाचा निर्णय?
शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत १० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. एवढ्या फेऱ्या होऊनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. याची गंभीर दखल घेऊन, मा. विधानसभा अध्यक्ष आणि शालेय शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार हा ११ वा विशेष फेरीचा निर्णय घेण्यात आला.
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले की, १० नियमित फेऱ्यांनंतर विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी दिली जात आहे. ही प्रक्रिया 11th Admission Final Round म्हणून राबवली जात आहे, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.
‘अंतिम संधी’ मध्ये तुम्हाला काय मिळेल?
या विशेष फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची आणि सर्वसमावेशक संधी मिळणार आहे:
- नवीन नोंदणी आणि दुरुस्ती: ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली नसेल, ते आता नवीन नोंदणी करू शकतात. तसेच, ज्यांनी अर्ज भरला आहे, त्यांना अर्ज भाग-१ मध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची मुभा आहे.
- पसंतीक्रम भरा: या 11th Admission Final Round मध्ये, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयांची यादी पुन्हा एकदा तयार करण्याची संधी आहे. ते त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान १ ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात.
- प्रवेश रद्द करण्याची मुभा: प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्याची आणि नवीन फेरीत अर्ज करण्याची देखील संधी मिळेल.
11th Admission Final Round
शिक्षण विभागाने अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की, हे वेळापत्रक सर्व विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अंतिम संधी आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहीर प्रकटनानुसार, यापुढे इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येणार नाही. शिक्षण विभागाने आवाहन केले आहे की, हीच खरी आणि अंतिम संधी आहे. यापुढे 11th Admission Final Round साठी कोणतीही मुदतवाढ किंवा नवी फेरी घेतली जाणार नाही.
11th Admission Final Round Time Table

विलंब न करता, विद्यार्थी आणि पालकांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर त्वरित भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा.
अधिक माहितीसाठी : अकरावी प्रवेश सूचना पत्र व वेळापत्रक पहा



