महाराष्ट्र विद्यापीठ अध्यापक भरती 2026: पारदर्शकता आणि गुणवत्तेवर आधारित नवीन नियमावली जाहीर

Published On: February 12, 2026
Follow Us
Pradhyapak Bharti New Rules 2026

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, निष्पक्षता आणि सुसूत्रता आणण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. (Pradhyapak Bharti New Rules 2026) नुसार आता भरती प्रक्रिया केवळ मुलाखतीवर अवलंबून न राहता, उमेदवाराच्या शैक्षणिक कारकीर्द, अध्यापन कौशल्य आणि संशोधन कार्यावर आधारित असेल.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले की, या नवीन कार्यपद्धतीमुळे ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक उमेदवारांना समान संधी मिळेल आणि संपूर्ण निवड प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होईल.

निवड प्रक्रियेचे नवे स्वरूप

आता होणारी विद्यापीठ अध्यापक भरती ही १०० गुणांच्या निकषांवर आधारित असेल. याचे विभाजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.

  • शैक्षणिक आणि संशोधन पात्रता (Academic & Research Credentials): ६०% गुण
  • अध्यापन कौशल्य चाचणी (Teaching Skill Assessment): २०% गुण
  • मुलाखत प्रदर्शन (Interview Performance): २०% गुण

या त्रिस्तरीय पद्धतीमुळे उमेदवाराच्या केवळ कागदोपत्री पात्रतेचीच नाही, तर प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याच्या कौशल्याचीही चाचणी घेतली जाणार आहे.

तासिका तत्त्वावरील व कंत्राटी शिक्षकांसाठी मोठा दिलासा

या नवीन (Pradhyapak Bharti New Rules 2026) नियमावलीत सर्वाधिक दिलासादायक बाब म्हणजे तासिका तत्त्वावर (CHB), कंत्राटी किंवा ॲडहॉक बेसिसवर काम करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना मिळालेली मान्यता, जर एखाद्या उमेदवाराने शैक्षणिक वर्षात किमान ९ महिने काम केले असेल, तर त्याचा अनुभव आता भरती प्रक्रियेत ग्राह्य धरला जाईल. प्रति वर्ष १ गुण याप्रमाणे जास्तीत जास्त ६ गुणांपर्यंत सवलत मिळू शकते. यामुळे वर्षानुवर्षे अल्प मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कायमस्वरूपी भरतीत फायदा होईल.

संशोधन आणि प्रकाशनाच्या अटीत सुसूत्रता

प्राध्यापक भरती महाराष्ट्र प्रक्रियेत मानव्यविज्ञान (Humanities) शाखेतील उमेदवारांसाठी संशोधनाच्या अटींबाबत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

प्रकाशने: केवळ ‘स्कोपस’ किंवा ‘वेब ऑफ सायन्स’च नाही, तर पीअर-रिव्ह्यू केलेल्या जर्नल्समधील शोधनिबंधांनाही महत्त्व देण्यात आले आहे.

पुस्तके: नामांकित प्रकाशकांकडे प्रकाशित केलेली संदर्भ पुस्तके, संपादित पुस्तके आणि अगदी आयपीआर (IPR) जनरेशनसाठीही गुण दिले जाणार आहेत.

विद्यापीठ रँकिंगनुसार गुणदान (NIRF/QS Ranking)

गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठी उमेदवाराने ज्या विद्यापीठातून पदवी किंवा पीएच.डी. पूर्ण केली आहे, त्या विद्यापीठाच्या रँकिंगनुसार गुणांचे गुणांकन (Scaling) केले जाईल.

  • NIRF Top 100 / International Top 500: पूर्ण गुण (Factor 1.0)
  • NIRF 101-200 / International 501-1000: ९०% गुण (Factor 0.9)
  • इतर युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठे: ८०% गुण (Factor 0.8)

पारदर्शकतेसाठी ‘ऑडिओ-व्हिडिओ’ रेकॉर्डिंग

भरती प्रक्रिया वादमुक्त राहण्यासाठी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी निवड समितीच्या कामकाजाचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, निवड झालेल्या आणि न झालेल्या उमेदवारांची गुणतालिका (Merit List) गुणांसह विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

Pradhyapak Bharti GR Maharashtra नुसार, उमेदवारांना मुलाखतीत किमान ५०% सरासरी गुण मिळवणे अनिवार्य आहे, तरच त्यांचा निवडीसाठी विचार केला जाईल.

थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे

  • आयसीटी (ICT) कौशल्ये: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याच्या क्षमतेवर विशेष भर
  • संशोधन प्रकल्प: राष्ट्रीय शिखर संस्थांकडून मिळालेला निधी आणि पेटंट्ससाठी अतिरिक्त गुण
  • NEP ज्ञान: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (NEP 2020) ज्ञान तपासले जाणार

Pradhyapak Bharti Pariksha 2026 अंतर्गत होणाऱ्या या सुधारीत प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होईल. इच्छुक उमेदवार या भरती संदर्भातील सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (संकेतांक: २०२६०२१११४१६४४११०८) पाहू शकतात.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment