Kotwal Anukampa GR राज्य सरकारचा मोठा निर्णय! कोतवाल अनुकंपा नोकरीचे नियम जाहीर, पात्रता, अटी व अर्जाची संपूर्ण माहिती येथे वाचा

Published On: May 8, 2025
Follow Us
Kotwal Anukampa GR

Kotwal Anukampa GR राज्य सरकारने महसूल विभागातील कोतवाल (महसूल सेवक) पदावरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता कोतवाल पदावर कार्यरत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघातामुळे वैद्यकीय दृष्ट्या सेवा देणे शक्य न झाल्यास, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला अनुकंपा तत्त्वावर कोतवाल पदावर नोकरी मिळणार आहे.

7 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार यास मान्यता देण्यात आली असून, आता सरकारने यासंबंधीची सविस्तर कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

Kotwal Anukampa GR पात्रता, अटी व अर्जाची संपूर्ण माहिती

कोतवाल (महसूल सेवक) शासकीय सेवेतील कर्मचारी सेवा करत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार किंवा अपघातामुळे पुढे नोकरी करणे अशक्य झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी यासाठी, त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर कोतवाल पदावर नोकरी देण्यास शासनाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी परवानगी दिली होती. त्या निर्णयानुसार आता कोतवाल पदासाठी अनुकंपा धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कामाची सविस्तर पद्धत जाहीर करण्यात आली आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबिय

  • मृत कर्मचाऱ्याचा पती / पत्नी
  • मुलगा / मुलगी (अविवाहित किंवा विवाहित)
  • मृत कोतवालाचा मुलगा नसल्यास त्याची सून
  • घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण
  • अविवाहित कोतवालाच्या बाबतीत त्याच्यावर पूर्णतः अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण

टिप: नोकरीसाठी कुटुंबातील एकच पात्र सदस्य निवडला जाईल आणि इतर सदस्यांचे संमतीपत्र आवश्यक असेल.

अनुकंपा नोकरीसाठी अटी व शर्ती

  • वयोमर्यादा: किमान 18 वर्ष, कमाल 45 वर्ष
  • शैक्षणिक अर्हता: किमान 4 थी पास
  • अर्ज सादर करण्याची मुदत:
    • मृत्यूच्या तारखेपासून एक वर्षात अर्ज करणे आवश्यक
    • जर वारसदार अल्पवयीन असेल, तर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करता येईल
    • उशीर झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे क्षमायाचना करता येईल, परंतु एकूण मुदत 3 वर्षांपर्यंतच

अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत आवश्यक माहिती

  1. कोण माहिती देणार?
    • संबंधित आस्थापना अधिकारी (जसे की तहसीलदार/संबंधित विभाग प्रमुख)
  2. माहिती कोणाला द्यायची?
    • दिवंगत महसूल सेवक (कोतवाल) यांचे कुटुंबीय/पात्र नातेवाईक
  3. माहिती कधी द्यायची?
    • कोतवालाच्या मृत्यूनंतर १५ दिवसांच्या आत
  4. कुठली माहिती द्यायची?
    • अनुकंपा तत्वावर नियुक्ती योजनेची सविस्तर माहिती, जसे की:
      • योजनेचा उद्देश
      • पात्र नातेवाईक कोण?
      • अर्ज करण्याची अंतिम मुदत
      • आवश्यक शैक्षणिक पात्रता
      • अर्जाचा विहीत नमुना (फॉर्म)
  5. इतर आवश्यक बाबी:
    • ही माहिती दिल्याबद्दल कुटुंबीयांकडून पोच घेणे आवश्यक आहे.

पात्र वारसदार जर अल्पवयीन (सज्ञान नसलेला) असेल तर:

  • असा वारसदार सज्ञान झाल्यावर (१८ वर्ष पूर्ण केल्यावर) एक वर्षाच्या आत अनुकंपा तत्वावर अर्ज करू शकतो.
  • मात्र, तो सज्ञान झाल्यावर अर्ज करावा लागेल हे कुटुंबाला लेखी स्वरूपात कळवणे आस्थापना अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत

(अ) सामान्य प्रकरणात:

जर महसूल विभागात (जसे की कोतवाल) काम करणारा कर्मचारी सेवेत असताना मरण पावला,
तर त्याच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने मृत्यू झाल्याच्या तारखेपासून १ वर्षाच्या आत
नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पूर्ण अर्ज (फॉर्मसह) सादर करणे आवश्यक आहे.

(आ) अज्ञान (18 वर्षाखालील) वारसदार असल्यास:

जर वारसदार अल्पवयीन (18 वर्षाखालील) असेल,
तर तो 18 वर्षाचा झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

(इ) अर्ज करण्यास उशीर झाल्यास:

जर योग्य कारणास्तव अर्ज 1 वर्षाच्या आत करता आला नाही,
तर अजून 2 वर्षे म्हणजे एकूण 3 वर्षे (मृत्यूच्या तारखेपासून) पर्यंत अर्ज करता येतो.
अशा उशिरा आलेल्या अर्जाला जिल्हाधिकारी क्षमापत्र देऊ शकतात.
अल्पवयीन वारसदाराच्या बाबतीत – तो 18 वर्षाचा झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत अर्ज करता येतो.

(ई) प्रतिक्षासूचीबाबत:

जोपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर होत नाहीत,
तोपर्यंत त्या व्यक्तीचे नाव प्रतिक्षासूचीत घेतले जाणार नाही.
सर्व कागदपत्रे पूर्ण मिळाल्यावरच त्यांचे नाव प्रतिक्षासूचीत घेतले जाईल.

महत्त्वाची प्रक्रिया

  • संबंधित आस्थापना अधिकारी 15 दिवसात कुटुंबाला माहिती देतील
  • प्रतिज्ञापत्र व ना-हरकत पत्र सादर करणे बंधनकारक
  • पात्र उमेदवाराची नावे “प्रतीक्षासूचीत” समाविष्ट केली जातील
  • प्रतीक्षासूची दरमहा अद्ययावत केली जाईल
  • प्रतीक्षासूचीतील उमेदवाराचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबातील दुसऱ्या पात्र वारसाला संधी

हा निर्णय शासनाने कोतवाल पदावरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कठीण प्रसंगी आधार देण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे अशा संकटग्रस्त कुटुंबांना आता तातडीची नोकरीची संधी मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी Kotwal Anukampa GR : शासन निर्णय येथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment